Thursday, November 11, 2010

शिक्षा..

जगण्याची सत्यता समोर येता,

थेंब ही गळका झाला..

त्या ओल्या पावसात,

का तो मल्हार अजून कोरडा !!

नको तो रंग, तो आकार मला,

सगळेच अर्थहीन त्या भाबड्या जीवाला..

त्या गुंतागुंतीच्या नात्यात,

का शिक्षा पुनः पुनः मला !!

नका ओढू काचेच्या क्षणाला..

मन असते आंधळे कातरवेळेला.

त्या भग्न हृदयात,

का सदा अंधाऱ्या रात्रीची मळकटता !!

गोफ तुटला विकल मनाचा..

सुखदुखाच्या सावल्यांचे तुकडे जमवता..

त्या भुंड्या दिवसात,

का भावनांची पालवी सारखी मोहरतात !!

--वैशाली

सध्या काही वाटणंच बंद झालंय!!

सध्या काही वाटणंच बंद झालं!!

नापास होऊदे वा appreaciation मिळूदे..

बस चुकुदे वा ऑफिसात लेट working kin राहूदे !

कुणी बोललं काय किंवा कुणी विसरलच काय..

सध्या काही वाटणंच बंद झालं!!

पावसात छत्री विसरू दे अगर भर उन्हात रांगेत ताटकळूदे ..

नेमका मंदिरात प्रसाद संपुदे किंवा कुणी उगीच cadbury देऊदे..

सध्या काही वाटणंच बंद झालं!!

असंच वाटता वाटता..

नेमका त्याचा फोन येतो..

तो म्हणतो.. आता हो कि settled !

माहीत आहे मला, हे सांगताना मन भरले होते त्याचे!

मी इकडे शांतच..

त्याला माहीत होते उत्तर माझे.. तरीही उगाच त्या वेड्या शपथ !!

म्हणतो कसा, तुला सुखी बघितल्याशिवाय चैन नाही मला..

जाणून आहे तो, माझ्या सुखाची व्याख्या अजूनही तो एकच.. !

मी इकडे शांतच..

द्वंद माजले मनात माझ्या

म्हणे माहीत आहे मला, तू नाकारली खूप स्थळं..

तुला असं बघता, मला खूप त्रास होतोगं..

विसरून जा जे काही होतं ते..

मला परत हवीये तू एका मैत्रिणीसारखी..

मला सांभाळायला.. (???)

मी इकडे शांतच..

खूप विचित्र चाललंय माझ्यासवे सगळं..

कसं समजाऊ तुला..

माझ्यामुळे तुझी हीं अवस्था नाही सहन होत मला..

माझ्यासाठी.. फ़क़्त माझ्यासाठी settled हो..

मग बघ.. तुझा मी कसा परत उमलतो..

मी इकडे शांतच..

काय उत्तरणार!! एकच वाटून गेले ..

आजपर्यंत जे काही घडलं ते तुझ्याचसाठी होतं रे!

आणि सगळं काही तुझ्याचमुळे!!

आता ह्यापुढेहीं सगळं तुझ्याचसाठी अन तुझ्याचमुळे !!

भरल्या डोळ्यांनी फोन ठेवला त्याने..

ती रात्र मावळता

मी शांतच !! आठवणींचे फुले वेचीत सगळे..

--वैशाली

तुझं साथ होती तेव्हा....

आता जगणं कसं नकोसं वाटतं..

काही मजाच राहिली नाही बघ..

तुझी साथ होती,

तेव्हा सगळं कसं छान, सुंदर होतं..

कसा डोळ्यांनी छेडायचास..

तुझ्या ती मूक नजर नेहमीच काहीतरी सांगायची..

कसं बरोबर समजायचं रे तुला,

मला तुझी गरज आहे ते

मनात आलं माझ्या की लगेच तू समोर असायचा,

माझे नखरे झेलायला..

मला कसारे कधीही राग यायचा .. (विनाकारणच असायचे ते खुपदा.. )

आणि तुला लगेच कळायचं की मी depressed आहे..

लगेच तुझा msg .. “Let’s meet..”

तुला कळले की नाही कुणास ठाऊक..

पण मला नेमकं तेच हवं असायचं..

मी का चिडले हे कधीही नाही विचारलेस तू..

फक़्त सांभाळलस मला..

प्रत्येक वेळी..

असे, की मी मलाच विसरले होते..

माझाच होतास तू,

फक़्त माझ्याचसाठी,

मला पुरेपूर समजणारा..

माझ्यावर पूर्ण हक़्क़ असणारा..

त्या दिवशी ..

कसे मी तुला जाऊ दिले..

काहीही बोलता, भांडता..

मला माझेच कळेनासे झाले

खरं तर

मला तू हवा होतास .. जन्मभर ..

भांडायचे होते मला तुझ्यासवे ..

जाब विचारायचा होता ..

की आता माझे काय..

मी तर विचारच नव्हता केला

तुझ्याशिवाय एकही क्षण घालवायचा..

आतून पार तुटले होते मी..

सगळी समीकरणं चुकवून गेलास..

गणितात कसं एकदम उत्तर शून्यावर आणलं तू integration चं..

फरक एवढाच की मला अपेक्षित ते infinity होतं..

एक मन हेही जाणून होते की

काहीतरी कारण असेलच..

तू का वाट वेगळी केलीस..

पण तरीही पायाखालची माती अजून भुसभुशीत होत गेली..

तुझे बांधारे बघत..

मला कळलेच नाही रे..

कधी माझा किनारा वाहून गेला..

-- वैशाली