जगण्याची सत्यता समोर येता,
थेंब ही गळका झाला..
त्या ओल्या पावसात,
का तो मल्हार अजून कोरडा !!
नको तो रंग, तो आकार मला,
सगळेच अर्थहीन त्या भाबड्या
त्या गुंतागुंतीच्या नात्यात,
का शिक्षा पुनः पुनः मला !!
नका ओढू काचेच्या क्षणाला..
मन असते आंधळे कातरवेळेला.
त्या भग्न हृदयात,
का सदा अंधाऱ्या रात्रीची मळकटता !!
गोफ तुटला विकल मनाचा..
सुखदुखाच्या सावल्यांचे तुकडे
त्या भुंड्या दिवसात,
का भावनांची पालवी सारखी मोहरतात !!
--वैशाली
No comments:
Post a Comment