असं रितं रितं झालंय मन आज..
कळत नाही कुणाची नजर लागली..
सगळं कसं नीट पार पडत होतं..
अचानक हि गळती धार का लागली??
पडले होते घराबाहेर मनात तुझे अगणित विचार घेऊन..
तुला भेटायचं, नंतर ऑफिस ला जायचं..
आज बहुदा दिवस छान जाईल असं उगीचच वाटलं..
नव्हती कल्पना कि दिवसाची अशी भयाण रात्र होईल..
अन् तुला भेटणं काय पण बघायचं सुद्धा भागी माझ्या नाही..
खरच किती काल्पनिक असतं सगळं..
हे समजलं मला त्या आक्रोशावरून..
कुठं रक्ताचा सडा तर कुठे आसवांचा..
आणि मी एकटीच…
मनात अगणित विचार तसेच..
फक़्त त्यांना आता दिशा उरली नाही एवढीच!!
--वैशाली
No comments:
Post a Comment